नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भाजप – शिवसेनेतील वाद वाढत गेल्याने शिवसेनेना महायुतीतून बाहेर पडत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यात शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणाही भाजपने केली आहे. त्यामुळे राज्यसभेतही शिवसेनेला वेगळे राहावे लंगर असल्याने राज्यसभेत एनडीए पुन्हा अल्पमतात जाणार आहे.
राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार आहेत. संजय राऊत हे देखिल यापैकीच एक आहेत. भाजपसोबत न जाण्याच्या निर्णयात राऊतांची महत्वाची भूमिका आहे, यामुळे विधेयक संमतीवेळी शिवसेना भाजपाला मतदान करते की काँग्रेसच्या बाजूने उभी राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार भाजपा नागरिकता सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडणार आहे. त्यामुळे या विधेयकाला विरोध करायचा की मंजुरी द्यायची अशा संभ्रमात शिवसेनेचे खासदार आहेत. महत्वाचे म्हणजे राज्यसभेत जदयू ६, आसाम गण परिषद सह पुर्वोत्तरमधील काही पक्ष विधेयकाच्या विरोधात आहेत. अशातच शिसेनेनेही काडीमोड घेतल्यानं भाजपाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
वास्तविक, राज्यसभेत एकूण २३८ सदस्य आहेत. त्यात भाजपाने अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या सदस्यांना आपल्या बाजुने केल्याने एकूण ११३ मते भाजपच्या बाजूने आहेत, परंतु विधेयक संमत करण्य़ासाठी भाजपाला आणखी ७ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजप बिजू जनता दल ७, टीआरएस ६ आणि वायएसआर काँग्रेसला या बाजुने वळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, लाखो हिंदू लोकांना एनआरसी रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यासाठी अपयश आल्याने हे राष्ट्रीय नागरिकता संशोधन विधेयक तयार करण्यात आले आहे. हे विधेयक न पास करणे भाजपसाठी महत्वाचे आहे, कारण हे विधेयक आसामनंतर अन्य राज्यांमध्येही लागू करायचे आहे.
Visit : bahujannama.com