मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- ‘आमच्याशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडे कधीही वेळ नव्हता याच वाईट वाटलं नाही, मात्र वाईट याच वाटत की, शिवसेनेकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी वेळ होता अशी खंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. आपला कार्यकाळ संपल्यानंतर राज्यापलांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.
“मला याचं वाईट वाटत नाही की, शिवसेनेला आमच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ नव्हता. चर्चा करण्यासाठी वेळ लागू शकतो हे मी समजू शकतो. मात्र शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी रोज वेळ होता. दिवसातून तीन-तीन वेळा चर्चा होत होती. ” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकदा फोन केला. संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी माझे फोन घेतले नाही. चर्चा करून प्रश्नावर सहज तोडगा निघाला असता. परंतु आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला चर्चाच करायची नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती, तरी महायुतीत आम्ही निवडणून आलो आहोत त्यामुळे महायुतीतच आम्ही सरकार स्थापन करू असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
Visit : bahujannama.com