मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेने सामना या मुखपत्रातून भाजपवर टीका केली आहे. शिवसेना- भाजपची युती आता कायमची तुटली हे आता स्पष्ट झालं आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. ३० वर्षांपासूनचे खांद्यावरचे ओझे हलके झाल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. मी पुन्हा येईन असे ठणकावून सांगणाऱ्या शक्यतांना पूर्ण विराम देत उद्धव यांनी भाजपवर बोचरी टीका केली. शनिवारी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे.
दोन्ही सभागृहामध्ये सत्ताधारी विदर्भाविषयीचा प्रस्ताव मांडणार आहे. तर विरोधी पक्षातर्फे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा प्रस्ताव मांडणार आहेत. या कारणामुळे पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने सामने येणार आहेत तसेच आज सरकार जीएसटी सुधारणा विधेयक मांडणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही म्हणून त्यांच्यावर बेकार होण्याची वेळ आली आहे. शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ‘त्यामुळे ओठाला लाली आणि तोंडाला पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकी देखील बंद करून घ्यावी’ असे शिवसेनेने स्पष्ट केले. आता आपल्यांत कोणतेही नाते उरलेले नाही तसेही नात्याचे ओझे होते तेही आता उतरले.
भाजपाचे ३० वर्षापासूनचे ओझे उतरवल्याची शुभवार्ता उद्धव ठाकरे यांनी दिली. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ! असे म्हणत ओझे उतरवल्याची अधिकृत घोषणा नागपुरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी हे जाहीर केल्यामुळे भाजपाने खिडकीत बसून ‘शुक शुक’ करणे, शीळ मारून लक्ष वेधून घेणे, दरवाजे उघडे आहेत, आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत,अशी डबडी वाजविणे बंद केले पाहिजे.नागपूरच्या अधिवेशनात काही मंडळींनी टोकाची वक्तव्ये केली. ‘आम्ही फार काळ विरोधी पक्षात बसणार नाही. पुढच्या अधिवेशनात आम्ही पुन्हा सत्तेवर असू’ अशी फेक विधाने करूनही नागपूरच्या थंडीत राजकीय हवा गरम झाली नाही. भाजपचे ओझे फक्त शिवसेनेनेच उतरवले नाही तर भाजपची सत्ता एकदाची गेल्यामुळे महाराष्ट्राच्या मनावरील ओझेही उतरले व हवा मोकळी झाल्याचे वातावरण निर्माण झाले.’
Visit : bahujannama.com