मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत फुट पडल्यानंतर पंधार दिवस घडलेल्या अनेक घडामोडीनंतर अखेर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने सत्तास्थापने असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मात्र, शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार हे अद्याप गुलदस्यात आहे. शिवसेनेचे ५६ आमदार त्यांना पाठिंबा देणारे ८ आमदार, राष्ट्रवादीचे ५४ आमदार, काँग्रेसचे ४४ आमदार म्हणजेच एकूण संख्याबळ १६२ हेत असल्यामुळे शिवसेनेला मॅजिक फिगर सहजपणे गाठता येणार आहे.विधानसभा निकालानंतर शिवसेना-भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले.
मात्र, शिवसेना मुख्यमंत्री पदावर आडून बसल्यामुळे भाजपची कोंडी झाली. भाजपने इतर प्रमुख मंत्रीपद देण्याची तयारी दाखवली होती मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून आडून राहिली. त्यामुळे अखेर दोन्ही पक्षातील युती संपुष्टात आली. दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर चर्चा झाली नसल्याचे सांगितले. तर शिवसेनेने आपल्याला खोटे पाडल्याचा दावा करत भाजपपासून दूर होत सत्तास्थापनेचा दावा केला.
दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊ चर्चा केली. शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी स्वत: शरद पवार यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव सादर केला. शिवसेनेला पाठिंबा देयचा की नाही यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. शेवटच्या क्षणापर्य़ंत उत्कंठा वाढवणाऱ्या या राजकीय आखाड्यात राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देत ‘शिवमहाआघीडी’चे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान शेवटचे काही तास शिल्लक असताना काँग्रेसमध्ये शिवसेनला पाठिंबा देण्यावरून मतभेद होते. मात्र, पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात आला होता. राष्ट्रवादीने पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर काँग्रेसने आपला पाठिंबा दिला.
Visit : bahujannama.com