बहुजननामा ऑनलाईन टीम – सध्या देशाभरात कांद्याचे दर गगनाला भिडत आहेत. कांदा प्रतिकिलो २२० रुपयांपर्यंत पोहोचाल आहे. याच पार्श्वभूमीवर संसदेतही कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा मांडण्यात आला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून कांद्याची दरवाढ होण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच दरवाढ कमी होण्यासाठी आता तुर्कीतून कांदा आयात करण्याची चूक सरकार करत असल्याचंही शरद पवार यांनी सांगतले.
काँग्रेस आणि आघाडी सरकारच्या काळात कृषीमंत्रीपद असलेले शरद पवार यांनी एका मुलाखतीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि कांद्याची दरवाढ याविषयावर चर्चा केली. कांद्याच्या दरवाढीबाबत आपण केंद्राला याची जाणीव करून दिली होती असं त्यांनी म्हणाले. तीन-चार महिन्यांपूर्वी शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत होते. पण सरकारने कांद्याला योग्य तो भाव दिला नाही. परिणामी शेतकऱ्यांनी दुसरी पिके घेतली आणि आता तुर्कीतून कांदा आयात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने चूक केली आहे. केंद्र सरकारला तीन महिने आधीच याबाबत पत्र लिहून कळवलं असल्याचंही पवारांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘राजकाराणात जेव्हा एकत्र येऊन काम करताना तडजोड करावीच लागते. फक्त शिवसेनेनं नाही तर राष्ट्रवादी,काँग्रेस यांनीही तडजोड केली. सरकार घटनेचा आदर करते आणि सेनेने ते स्वीकारले. सुरुवातीला मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे विभागून देण्याची चर्चा होती पण सेनेची ५ वर्षांची मागणी होती. आम्ही तडजोड स्वीकारून सेनेची मागणी मान्य केली.