मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकासआघाडी सरकारवर भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही, असा टोला नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री नाराय राणे यांनी नव्या सरकारला निशाण्यावर धरले आहे. ‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फारकाळ टिकणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केवळ स्वार्थापोटी एकत्र येत हे सरकार स्थापन केले आहे, असा हल्लाबोल राणी यांनी केला. तसेच, ”सरकारकडून विविध विकासकामांना स्थगिती दिली जात आहे. सत्ता बदलल्यानंतर कोकणातील विविध विकासकामे ही ठप्प झाली आहेत. त्यामुळे या सरकारचे स्थगिती सरकार असे नामकरण करता येईल,” असा टोला राणेंनी लगावला.
जिल्ह्यात घेतलेल्या आढावा बैठकीच्या मुद्यावरून खासदार विनायक राऊत यांच्यावरही राणेंनी जोरदार टीका केली. शिवसेना आता सत्तेत नाही. त्यामुळे राऊत यांनी कोणत्या अधिकारांमध्ये जिल्ह्यात आढावा बैठक घेतली. बेकायदेशीर बैठका घेऊन शिवसेनेकडून काम करत असल्याचा भास निर्माण केला जात आहे, सत्तारूढ पक्षाचे खासदार नसताना त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना कोणत्या अधिकारात आदेश दिले, असा सवाल त्यांनी यावेळीही उपस्थित केला. असेही राणे म्हणाले.
राणे यांनी यावेळी ”राज्यात तीन पक्षांना एकत्र येत स्थापन केलेले सरकार हे कसे उपयुक्त नाही याची माहिती आम्ही जनतेला देणार असल्याचं सांगितले आहे. त्यासाठी १५ ते १८ डिसेंबरदरम्यान गाव बैठका घेणार आहोत, तसेच क वर्ग देवस्थांना मिळणाऱ्या निधीला स्थगिती देण्याचा निर्णयाला आम्ही विरोध करू, तसेच विकासाबाबतचा अन्यायही सहन करून घेणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.