बहुजननामा ऑनलाइन टीम – शरद पवारांच्या झंझावती प्रचाराला यश आल्याचे आजच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. भाजप 220 पारचा नारा सत्यता उतरवण्यात अपयशी ठरले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूकीचा निकाल हाती येत असतानाच पत्रकार परिषद घेऊन मतदारांचे, कार्यकर्त्याचे आभार मानले. यावर बोलताना शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला. सत्तेचा उन्माद जनतेने स्विकारला नसल्याचे सांगत शरद पवारांनी सत्ताधारी भाजपला चिमटा काढला.
भाजपला 220 चा आकडा पार करता आला नाही यावर बोलताना पवार म्हणाले की 220 के पार जनतेने स्विकारले नाही, भाजपला असलेला सत्तेचा उन्माद जनतेने पाहिला, पक्षांतरामुळे भाजपला जनतेते धडा शिकवला, सत्तेचा उन्माद जनतेला पसंत पडला नाही.सत्ता येते सत्ता जाते परंतू जमिनीवर पाय ठेवावे लागतात असे म्हणत शरद पवारांनी साताऱ्याच्या लोकसभा निवडणूकीवर भाष्य केले, शरद पवारांनी साताऱ्याच्या निकालानंतर जनतेचे आभार मानले.
साताऱ्याच्या गादीचा आदर सर्वांना आहे, मात्र साताऱ्याच्या गादीचा आदर न करणाऱ्यांचा हा पराभव असल्याचे देखील त्यांनी सांगितले. जनतेने दिलेला कौल आपण मान्य करत आहोत, कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली, त्याचे आभार मानतो असे देखील पवारांनी सांगितले. जनतेच्या कौलानुसार भाजप 100 च्या आसपास जागावर यश मिळताना दिसत आहे तर राष्ट्रवादी 55 च्या आसपास जागावर यश मिळवेल, काँग्रेस 45 च्या आसपास जागा जिंकेल असे चित्र आहे.
Visit : bahujannama.com