बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई: वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं. जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नाहीत. त्यामुळे जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे हाती आले असतील तर पोलिसांनी कारवाई केली असेल. त्याच्याशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असण्याचं कारण नाही,” असं राऊत यांनी म्हंटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले,
पत्रकारितेसाठी हा काळा दिवस असल्याचं मला वाटत नाही. पत्रकारांनीही आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असताना मर्यादा पाळल्या पाहिजेत. सुप्रीम कोर्टाने त्या चॅनेलसंबंधी काय सांगितलं आहे ते समजून घ्या. तुम्ही न्यायालय किंवा तपास यंत्रणा नाही. तुम्ही कोणाविरोधातही काहीही सांगून लोकांची दिशाभूल करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं असताना त्यांनाही हा काळा दिवस आहे विचारणार का?,” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.