मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्ताबदलामुळे आधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद सुरु आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या भिंतीवर लिहिला गेलेला मजकूर व्हायरल होत आहे. त्या आक्षेपार्ह मजकूराबद्दल चर्चा चालू असताना आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
बंगल्यातील मजकूर हा युतीबद्द्दल आहे. या मजकूराबद्दल प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, ‘मी तो मजकूर अजून पाहिलेला नसून मी कधीही वर्षा बंगल्यावर गेलेलो नाही. जो काही मजकूर आहे त्याला रंग देऊन मिटवता येईल. पण ज्या कोणी हा मजकूर लिहिला आहे, त्याच तोंड काळ झालं आहे.’
महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बांगला सोडावा लागला. त्यांनी बंगला सोडल्यानंतर बंगल्याच्या भिंतीवर युतीबद्दल आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर हे डर्टी पॉलिटिक्स असून हा सगळा प्रकार बदनामीसाठी केला जात आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
Visit : bahujannama.com