पुणे : बहुजननामा ऑनलाईन – नाईक निंबाळकर यांचे समर्थन करणाऱ्यांना मीच कालवा समितीमधून वगळले, असे उत्तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले आहे. सध्या पुण्यात कालवा समितीची बैठक सुरु असून या बैठकीला अजित पवार यांच्यासोबत इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
कालवा समितीतून चार लोकांना वगळले असून त्यात जयंत पाटील यांनी माझ्या समर्थकांना वगळल्याचा आरोप ही बैठक होण्याअगोदर नाईक निंबाळकर यांनी केला होता. आमदार जयमकुमार गोरे, श्रीकांत देशमुख, विश्वास भोसले, माजी सनदी अधिकारी, उत्तमराव जानकर अशी वगळल्या गेलेल्यांची नावे आहेत. जयमकुमार यांनी आरोप केला आहे की, नीरा डाव्या कालव्याच्या निर्णयामुळे आणि बारामतीसोबत इमानदार राहण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
यावर मी त्या खात्याचा मंत्री असून त्यांची उपयोगिता दिसली नाही म्हणून माझ्या सांगण्यावरून त्यांना वगळले. त्यात काय प्रॉब्लेम आहे ?, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे. निंबाळकर यांच्या आग्रहावरुनच नीरा देवघर प्रकल्पाचे चाळीस टक्के पाणी माढ्यात वळविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला मिळणार आहे. पाणी पळवण्यावरून बारामतीकरांवर निंबाळकर यांनी निशाणा साधला. पण महाविकास आघाडीचे सरकार येताच निंबाळकर यांच्या समर्थकांनाच कालवा समितीतून वगळण्यात आले.
Visit : bahujannama.com