बहुजननामा ऑनलाईन – पाकव्याप्त कश्मीर हा भारताचाच एक भाग आहे. लवकरच तो भारताचा भौगोलिक भाग होईल. अशी अपेक्षा आहे. कलम ३७० हा द्विपक्षीय मुद्दा नसून तो अंतर्गत मुद्दा आहे. असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी नरेंद्र मोदी सरकारला १०० दिवस पुर्ण झाल्याबद्दल केले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून मोदी सरकारच्या अनेक मंत्र्यांनी पीओकेबाबत निवेदने दिली आहेत.
अलीकडे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही पुढचा अजेंडा पुन्हा पाकव्याप्त कश्मीर मिळवायचा असल्याचे सांगितले. तर सरकारच्या १०० दिवसांच्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत कलम ३७० वर जयशंकर म्हणाले की, कलम ३७० ही भारताची अंतर्गत बाब आहे. तर पाकिस्तानसोबतचा दहशतवादाचा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सर्व देश कलम ३७० च्या स्थितीबाबत समजू शकतात. तर सार्क प्रादेशिक मुद्द्यांबाबत आहे.
कोणता देश सार्कला प्रोत्साहन देतो आणि कोणता देश दहशतवादाला प्रोत्साहन देतो हे सदस्यांनी ठरवायचे आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी कुलभूषण जाधव प्रकरणावरही प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले की, कुलभुषण यांना कौन्सिलर ऍक्सेस देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आता आम्ही निरपराध व्यक्तीला आपल्या देशात परत आणण्यासाठी तोडगा काढत आहोत.
EAM S. Jaishankar: PoK (Pakistan Occupied Kashmir) is a part of India and we expect one day we will have physical jurisdiction over it. pic.twitter.com/9XUVAbnVor
— ANI (@ANI) September 17, 2019