मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील वातावरण युद्धजन्य पाहायला मिळते. त्यातच देशाचे हित आणि राज्यातील नागरिकांची सुरक्षा विचारात घेऊन विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यास आम्ही सहमती दिली.पण सत्ताधारी भाजप देशहितापेक्षा निवडणुकीच्या तयारीत दंग आहे. असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी स्थगित करण्यात आले. त्यानंतर विधान भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेत्यांनी अर्थसंकल्पवर टीका करताना हे आर्थसंकप्ल विविध समाजघटकांची मोट्या प्रमाणात उपेक्षा करण्यात आल्याचे विरोधकांनी सांगितले.
राज्याच्या अर्थसंकल्पात मोट्या प्रमाणात युवकांच्या नोकरभरतीची निराशा केली आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. शेतकरी. कष्टकरी. मागासवर्गीय. आदिवासी. अल्पसंख्याक. महिला, विद्यार्थी, युवक, व्यापारी, उद्योजक अशा कुठल्याही घटकाला न्याय मिळालेला नाही. अशा हल्लाबोल सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी केला.
हा अर्थसंकल्प वस्तुस्थितीशी विसंगत आहे. शेतकऱ्यांना. सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी काय केले पाहिजे. या संदर्भातील आम्ही शिफारशी सभागृहाच्या पटलावर ठेवल्या आहेत. सरकारने त्यावर विचार करून अंमलबजावणी करावी. आणि सत्ताधाऱ्यांनी आम्हाला कळवावे. अशी मागणी आपण सभागृहात केल्याचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी सांगितले.