लखनऊ : वृत्तसंस्था – आरक्षण हे मानवतवादी संविधानिक व्यवस्था आहे त्यामुळे आरएसएसने आपली आरक्षणविरोधी मानसिकता सोडावी असं वक्तव्य बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी केलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे मायावती यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे.
रविवारी मोहन भागवत एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, “जे आरक्षण समर्थक आहेत किंवा आरक्षणविरोधी आहेत अशा दोन्ही लोकांमध्ये सद्भावनापूर्ण वातावरणात चर्चा व्हायला हवी. आरक्षणाची चर्चा करायची म्हटलं तरी वाद निर्माण होतो.”
आरएसएस का एससी/एसटी/ओबीसी आरक्षण के सम्बंध में यह कहना कि इसपर खुले दिल से बहस होनी चाहिए, संदेह की घातक स्थिति पैदा करता है जिसकी कोई जरूरत नहीं है। आरक्षण मानवतावादी संवैधानिक व्यवस्था है जिससे छेड़छाड़ अनुचित व अन्याय है। संघ अपनी आरक्षण-विरोधी मानसिकता त्याग दे तो बेहतर है।
— Mayawati (@Mayawati) August 19, 2019
भागवत यांच्या वक्तव्यावर मायावती यांनी जोरदार टीका केली आहे. ट्विट करत आपली नाराजी व्यक्त करत मायावती म्हणाल्या की, “आरएसएसचे म्हणणे आहे की, अनुसूचित जाती(एससी) अनुसूचित जमाती (एसटी) आणि ओबीसी आरक्षणावर खुलेपणाने चर्चा व्हायला हवी. जाणीवपूर्वक संशयाचे वातावरण निर्माण करणे धोकादायक आहे. अशा गोष्टींची काहीही गरज नाही. आरक्षण हे मानवतावादी संविधानिक व्यवस्था आहे. संघाने आपली आरक्षणविरोधी मानसिकता सोडून द्यायला हवी.”