नवी दिल्ली वृत्तसंस्था : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्त्यव्यावर काँग्रेस ने देखील चांगलेच प्रतित्युत्तर दिले आहे. भागवत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दलित-मागासवर्गविरोधी संघ आणि भाजप पक्षाचा चेहरा उघड झाला आहे, अशी टिका काँग्रेस ने केली आहे. मोहन भागवत यांनी म्हंटल्याप्रमाणे , “राखीव जागांच्या बाजूने असणार्या आणि त्यांच्या विरोधात असणार्या लोकांमध्ये सुसंवादी वातावरणात संभाषण व्हायला हवे. ” त्यांनी केलेल्या या विधानावर काँग्रेस ने दुसऱ्याच दिवशी त्यांना आणि भाजप पक्षाला धारेवर धरले आहे.
” गरिबांसाठीच्या राखीव जागा संपवण्याचा कट आणि घटनेत बदल करण्याचे त्यांचे धोरण उघड झाले आहे. दलित-मागासवर्गीयांचे हक्क हिसकावून घेणे, गरिबांच्या मूलभूत हक्क हिसकावून घेणे तसेच कायद्याचे उल्लंघन करणे, नियमांचे उल्लंघन करणे हा, भाजप पक्षाचा अजेंडा आहे. त्यामुळे दलित-मागासवर्गाच्या विरोधातील संघ-भाजपचा चेहरा समोर आला आहे, “अशी टीका पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. अनुसूचित जाती/जमातींसाठीच्या राखीव जागा राहिल्याच पाहिजेत. राखीव जागांविषयी चर्चेची गरज असल्याचे मला वाटत नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे म्हणणे असून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी देखील राखीव जागा ही घटनात्मक व्यवस्था असून तिच्यात हस्तक्षेप करणे हा अन्याय आहे, असे म्हटले आहे.
मोहन भागवत हे ‘ग्यान उत्सव’ या स्पर्धात्मक परीक्षांवर आयोजित कार्यक्रमात बोलत होते कि , “राखीव जागांच्या बाजूने असलेले आणि राखीव जागांच्या विरोधी असलेल्यांची एकदा एकमेकांचे म्हणणे एकूण घेतले तर, तर या प्रश्नाचे उत्तर शोधणे सोपे होईल. कायद्याशिवाय, नियमांशिवाय जोपर्यंत समाजात सलोखा , ऐक्य निर्माण होणार नाही तोपर्यंत कोणीही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. आपण असा प्रयत्न करायला हवा आणि संघ त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे.” संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरूण कुमार यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही नेहमीच राखीव जागांना पाठिंबा दिलेला आहे. अनुसूचित जाती – जमाती, ओबीसी व आर्थिक आधारावर मागासलेल्या वर्गांसाठी राखीव जागांना संघाचा पाठिंबाच आहे व ही गोष्ट अनेक वेळा स्पष्ट करण्यात आली आहे.