नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाचा विषय त्यांच्या अजेंड्यावर असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशाच्या मुरादाबादमध्ये संघातर्फे आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे.
एवढेच नाही तर मोहन भागवत यांनी ‘लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यावर संघ राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल. सध्या देशातील वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असून त्यासाठी दोनच मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणायला पाहिजे. लोकसंख्या नियंत्रणात येईल,’ असेही म्हटल्याची माहिती मिळत आहे.
भागवत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते यांनी टीका करत जबरदस्तीने नसबंदी करायची का? असा प्रश्न उपस्थित केला.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा