नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोटाबंदीनंतर चालवल्या गेलेल्या 2000 रुपयांच्या नोटांच्या भविष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. खरं तर बँकांनी त्यांच्या स्वयंचलित टेलर मशीनमध्ये (ATM) बदल करून अशा नोटांच्या जागी 500 नोटा ठेवण्याची मोठ्या प्रमाणात कसरत केली जात आहे.
यामुळे, 2000 रुपयांच्या नोटा बंद केल्या जातील याबाबत पुन्हा चर्चेला पेव फुटला आहे. बिझिनेस स्टँडर्डने देशभरात सुमारे २.40 लाख एटीएम मशीन मध्ये मोठ्या प्रमाणात रिकॅलीब्रेट करून २००० च्या नोटांच्या जागी ५०० च्या नोटा बदलून देण्याचे काम सुरु आहे.
काय बदल होत आहे
वास्तविक, एटीएमच्या चार कॅसेट आहेत ज्यात 2000, 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा ठेवल्या आहेत. नव्या व्यवस्थेनुसार पहिल्या तीन कॅसेटमध्ये 500 रुपयांच्या नोटा ठेवल्या जातील आणि 200 किंवा 100 रुपयांच्या नोटा चौथ्या कॅसेट्मध्ये ठेवल्या जात आहेत. वृत्तानुसार, अनेक एटीएममध्ये 2000 च्या नोटांच्या कॅसेट काढल्या गेल्या आहेत आणि उर्वरित वर्षभरात काढल्या जाऊ शकतात. आता ज्या २००० च्या नोटा येत आहेत त्यांना बँकांच्या करन्सी चेस्ट मध्ये ठेवले जात आहे. म्हणजेच त्या रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत परत पाठविल्या जाऊ शकतात.
नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर, २०१७ च्या सुरुवातीला 2000 रुपयांच्या नोटा आणल्या गेल्या. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०१७ च्या सुरूवातीस, एकूण सर्क्युलेटेड बँकांच्या 5० टक्के 2000 च्या नोटांच्या होत्या. पण आथिर्क वर्ष २०१९ मध्ये सर्क्युलेटेड नोटांमध्ये ५१ टक्के हिस्सा 500 रुपयांच्या नोटांचा होता.
ग्राहकांना घाबरण्याची आवश्यकता नाही
2000 रुपयांच्या नोटा कायदेशीररित्या बंद केल्या जाणार नाहीत, तर त्या चलनबाहेर ठेवल्या जातील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय एटीएम कॅसेटमध्ये बदल हळूहळू होत आहे. त्यामुळे बँकांच्या ग्राहकांना घाबरून जाण्याची गरज नाही.
या महिन्यात इंडियन बँक ऑफ पब्लिक सेक्टरने आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे की एटीएम मशीनमधून 2 हजार रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. पुढील 1 मार्चपासून इंडियन बँकेच्या एटीएममध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा असलेल्या कॅसेट काढल्या जातील, असे बँकेने एका परिपत्रकात म्हटले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.इंडियन बँक अलाहाबाद बँकेत विलीन होणार आहे. हे विलीनीकरण 1 एप्रिलपासून अस्तित्वात येईल. विलीनीकरणानंतरची ही सर्वात मोठी बँक असेल.