जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – संविधान बचाओ कृती समितीतर्फे भारतात ३१ राज्ये व ५५० जिल्ह्यांना प्रभावित करणारी राष्ट्रव्यापी श्रेणीबध्द आंदोलन पार पडले. धरणगाव येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने १२४ वे संविधान संशोधन बिल वापस घेणे व १० टक्के आर्थिक आधारावर दिलेला आरक्षणाचा विरोध तसेच ईव्हीएमच्या संबंधित निवडणूक आयोगाला सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघनाच्या विरोधात ५ करोड स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.
यावेळी संविधान बचाओ संघर्ष समितीचे तालुका संयोजक ओंकार माळी, निलेश पवार व लक्ष्मण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ओंकार माळी, मोहन शिंदे, बाबासाहेब राजेंद्र माळी, पी.डी. पाटील, निलेश पवार, गोपाल पाटील, व्ही.टी.माळी , लक्ष्मण पाटील , राहुल पवार, रविंद्र महाजन, मयूर भामरे, दीपक माळी, गौतम गजरे, किरण सोनवणे, प्रक्षिक निकम, आनंदराज पाटील,विजय माळी, राहुल पाटील, सिराज कुरेशी, सुरेश सोनवणे, सुनिल माळी, रिंकू पाटील, निवृत्ती माळी, नंदलाल माळी, सुनिल बडगुजर,राहुल सोनवणे,श्याम साळुंखे आदी मुलनिवासी बांधव उपस्थित होते. तसेच धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव देखील उपस्थित होते. तहसिलदाराच्या वतीने पंकज शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.