मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याची घोषणा केली. पण त्याला किती प्रमानात प्रतिसाद मिळतो हे पाहणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकरांनी माझ्यावर टीका केली असली तरी त्याबदल माझ्या मनात आदर आहे असे आठवले म्हणाले. आंबेडकरी चळवळ गटातटात विभागल्यामुळे बाबासाहेबांच्या स्वप्नातील पक्षाला एकही जागा मिळत नाही हे दुर्देव आहे. मी सर्व गटांना अवाहन करतो कि पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्य झाले तर पक्षाचा नेता म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यकरण्यास तयार आहे, असे आठवले म्हणाले.
भीमा कोरेगाव प्रकरणात प्रकाश आंबेडकरांना प्रसिद्धी मिळाली असली तरी माझ्या प्रसिद्धिमध्ये आजिबात घट झाली नाही असेही यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मी कोणी विचारवंत नाही, मी काही पुस्तके लिहिलेली नाहीत, परंतु मी चांगला विचार करतो. माझ्याकडे खूप चांगले कार्यकर्ते आहेत. ऐक्य झाले पाहिजे. ऐक्याला विरोध करणा-या नेत्यांना आता समाजानेच धडा शिकवला पाहीजे. असे आठवले म्हणाले.
आरपीआय पक्षाच्या कार्याचा आढावा देतांना माझ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या गावपातळीवरच शाखा नसून आता ते देशपातळीवर मोट्या प्रमाणात काम चालू आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे मताची विभागणी होऊन भाजप आणि शिवसेनेला त्याचा फायदा होईल असेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.