बहुजननामा ऑनलाइन – प्राचीन काळात अतिशय शक्तीशाली राक्षस होता, त्याचे नाव होते दारूण. त्याला वरदान मिळाले होते की, त्याचा मृत्यू कोणत्या पुरूषाच्या नव्हे, तर स्त्रीच्या हाताने होऊ शकतो. त्याच्या अत्याचारांमुळे सर्व देवगण दुखी होते. याच समस्येतून मार्ग काढण्यासाठी सर्व देव बह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवाने ही समस्या सोडवण्यासाठी स्त्रीरूप धारण केले आणि दारूणचा वध करण्यासाठी गेले. परंतु, युद्धात ते दारूणचा पराभव करू शकले नाहीत. यानंतर सर्व देवगण ब्रह्मदेवासोबत भगवान शंकराकडे गेले. सर्वांनी त्यांच्याकडे मदत मागितली.
भगवान शंकरांना सर्वजण प्रार्थना करू लागले. यावेळी भगवान शंकराने हसत पार्वती मातेकडे पाहिले. त्यांनी इशाराकरून मातेला समजावले. यावर पार्वती मातेने एक अंश काढला जो त्यांचीच शक्ती होती. तो अंश एक चमकणारे तेज होते. हा अंश बघता-बघता भगवान शंकरांच्या नीलकंठातून त्यांच्या शरीरात गेला. नंतर भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला. यामुळे तिन्ही लोक भितीने थरथर कापू लागले. त्यांचा तिसरा डोळा उघडला आणि त्यामधून एक शक्ती बाहेर निघाली. हे पाहून सर्व देव भयभीत झाले.
ही शक्ती विशाल आणि रौद्र होती. शक्तीचा रंग गडद काळा आणि जीभ लाल होती. तिच्या चेहर्यावर तेज असे होते, जणूकाही आग असावी. कपाळावर तिसरा डोळासुद्धा होता. अशाप्रकारे कालीमातेचा जन्म झाला. काहीवेळातच कालीमातेने दारूण आणि त्याच्या सर्व साथादारांचा विनाश केला.
कालीमातेने काही वेळातच दारूण राक्षस आणि त्याच्या सैन्याचा संपूर्ण नाश केला. मात्र, त्या सर्वांचा नाश करूनही कालीमातेचा रांग शांत झाला नव्हता. यामुळे त्यांचा राग शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी एका बाळाचे रूप धारण केले. या रूपात ते कालीमातेच्या समोर गेले. त्यांना पाहताच कालीमातेचा राग शांत झाला.