बहुजननामा ऑनलाइन टीम – लॉकडाउन काळात बंद केलेले शिर्डीतील श्री साईबाबा समाधी(Shirdi Sansthan) मंदिर राज्य सरकारच्या आदेशानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुले करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरामध्ये एका दिवसात दररोज सहा हजार साईभक्तांना ( Shirdi Saibaba Darshan) दर्शन दिले जात आहे. मात्र, आता दररोज साधारणपणे आठ ते नऊ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा, (nine-thousand-devotees-will-
लॉकडाउनमुळे 17 मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद होते. राज्य सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी पाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डी येथील मंदिर उघडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात गर्दी होऊ नये, यासाठी दिवसभरात 6 भाविकांना दर्शनाकरिता प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता गेल्या दोन दिवसांतील परिस्थितीचा अभ्यास करता दर्शनाचा लाभ अधिक भाविकांना देणे शक्य असल्याचे चित्र आहे. त्यानुसार संस्थानने नियोजन सुरू केले आहे.
सध्या सहा हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जात असून, ही संख्या वाढवता येऊ शकते. कारण भक्तांचे आपल्याला चांगले सहकार्य मिळत आहे. सध्या दर्शन मंडपात (गाभाऱ्यात) गेल्यानंतर एक भक्त सरासरी पाच मिनिटे त्या परिसरात राहतो. एकावेळी जवळपास सत्तर भक्त दर्शन मंडप परिसरात फिरत असतात व श्री साईबाबांच्या समाधीजवळ एक भक्त पाच ते दहा सेकंद थांबतो. त्यामुळे आपण ठरवल्यापेक्षा दोन ते तीन हजारांनी दर्शन घेणाऱ्यांची संख्या जास्त होऊ शकते. साधारणपणे हा आकडा नऊ हजारांपर्यंत वाढू शकतो, तसा आवाका आम्हाला आला आहे. दोन दिवसांत तसा अंदाज आला आहे. लवकरच याबाबत वेबसाइटला माहिती देणार असून, दर्शन घेणाऱ्यांची संख्या वाढवण्याची कार्यवाही प्रत्यक्ष मूर्तरूपात येईल.