पुणे बहुजननामा ऑनलाईन – राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. तरुणांना रोजगार नाही. तरुण आई वडिलांच्या हातात आलेली महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. कुठेही पाऊस नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे सरकार जर कार्यक्षम असेल आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणारे असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ ‘दीड दिवसाचे विशेष अधिवेशन’ घेऊन महाराष्ट्रामध्ये ‘दोन लाख पदांची नोकर भरती’ करावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना सविस्तर निवेदन देऊन राज्य सरकारला विनंती केली. राज्यात दीड ते दोन लाख शासकीय पदे रिक्त आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. याची गंभीर दखल घेऊन ९०% स्थानिकांना सर्व क्षेत्रात प्राधान्य द्यावे. व ‘नोकर भरती’ करावी. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती वय मर्यादा ५८ वर्ष वरून ५५ वर्ष करावे. ही विनंती. मात्र ५८ चे ६० वर्ष करू नये. हा तरूणांवरचा अन्याय आहे. तो सरकारने दुर करावा.
महाराष्ट्रात दुष्काळात तरुणांच्या नोकरीची समस्या गंभीर झाली आहे. राज्यातील तरुणांसाठी सर्व स्तरावर ९० टक्के नोकऱ्या आरक्षित कराव्यात. महाराष्ट्रातील ९० टक्के तरुणांना नोकरीच्या स्वतंत्र संधी उपलब्ध करून खाजगी, IT कंपनी, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय स्तरावर महाराष्ट्रातील तरुणांना प्रथम प्राधान्य द्यावे. ‘तसा कायदा करावा’ तसेच सुमारे (दीड लाख ते दोन लाख पदांची) शासकीय नोकर भरती करावी.
पुणे जिल्ह्यातील सर्व IT कंपनी, खाजगी, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय स्तरावर महाराष्ट्रातील 90 टक्के तरुणांना प्रथम प्राधान्य द्यावे. तर महाराष्ट्र वाचेल आणि बेरोजगारी संपेल. अन्यथा ‘संभाजी ब्रिगेड’ पुणे जिल्हा नोकरी संदर्भात संघर्षात्मक आंदोलन करणार आहे. असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी ‘संभाजी ब्रिगेड’ चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, महादेव मातेरे, उमेश देवगिरीकर, सनी थोपटे, मंदार बहिरट, सचिन जोशी, विनायक घुले आदी उपस्थित होते.