बहुजननामा ऑनलाइन –
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘रेप इन इंडिया’च्या विधानावरून लोकसभेत गदारोळ सुरू आहे. भाजपच्या सर्व महिला खासदार राहुल गांधींकडून माफी मागण्याची मागणी करत आहेत, पण आता कॉंग्रेसनेही यावर पलटवार केला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला ‘रेप कॉपिटल’ म्हणून संबोधत आहेत. राहुलशिवाय रणदीप सुरजेवाला यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे.
Modi should apologise.
1. For burning the North East.
2. For destroying India’s economy.
3. For this speech, a clip of which I'm attaching. pic.twitter.com/KgPU8dpmrE
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 13, 2019
राहुल गांधी यांनी जो व्हिडिओ ट्विट केला आहे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॉपिटल म्हणत आहेत. रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की पंतप्रधान मोदी देशात पसरलेली अराजकतेवरुन लक्ष भटकवण्यासाठी संसद चालू देत नाहीत. त्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की देशातील तरुणी, बलात्कार प्रकरणावर निर्णायक कार्यवाही व्हावी अशी इच्छा व्यक्त करत आहेत. रेप इन इंडिया तुम्हाला मान्य नसेल तर तुम्हीच केलेले वक्तव्य तुम्ही ऐका, जर हे योग्य नसेल तर स्वत: माफी मागा.
मोदीजी,
देश में फैली अराजकता से ध्यान बाँटने के लिए आप खुद ही संसद नही चलने दे रहे
जान लें, देश की बेटियाँ आए दिन की रेप व मनमानी के ख़िलाफ़ निर्णायक कार्यवाही चाहती हैं।
रेप इन इंडिया मंज़ूर नही।
और इस बारे खुद का ब्यान भी सुनिए⬇️
अगर यह सही नही, तो पहले खुद माफ़ी माँगिए। pic.twitter.com/YvZYDB0dgr
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) December 13, 2019
रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा जो जुना व्हिडिओ ट्विट केला आहे, त्यात ते म्हणाले आहेत की, सध्या दिल्लीत बलात्काराच्या अनेक घटना घडत आहे. दिल्ली रेप कॉपिटल बनली आहे. दिल्लीला ज्या प्रकारे रेप कॉपिटल बनवण्यात आले आहे त्यामुळे संपूर्ण जगात भारताची बदनामी होत आहे. तुमच्याकडे आई बहीणीच्या सुरक्षेसाठी ना कोणतीही योजना आहे ना दम आहे आणि ना यासाठी तुम्ही काही करत आहेत.
सध्या झारखंडमध्ये निवडणूकांचा प्रचार सुरु आहे. झारखंडमध्ये पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियावर निशाना साधताना राहुल गांधींनी मेक इन इंडियाची तुलना रेप इन इंडियाशी केली. यामुळे शुक्रवारी संसदेत गोंधळ झाला. स्मृती इराणी यांच्या नेतृत्वात भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधींनी संसदेत माफी मागावी अशी मागणी केली. तसेच त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी देखील मागणी करण्यात आली. याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. राहुल गांधी लोकसभेचे सदस्य राहण्याच्या पात्रतेचे नसल्याचे ते म्हणाले.