मुंबई बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना देताना मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हा निर्णय मराठा आरक्षणाला दिलासा देणारा असून या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या कायद्याला उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. शिक्षणात १२ टक्के आणि नोकरी मध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल झाल्यानंतर त्यावर निर्णय देताना मराठा अरक्षणास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
तसेच मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेप्रकरणी राज्य सरकारला आपले म्हणणे मांडण्याची नोटीस सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. दोन आठवड्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत महाराष्ट्र सरकार चांगली बाजू मांडून मराठा आरक्षण अधिकृत ठरेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.