नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्यावर टीका केल्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये खूप ट्रोल झाले होते त्यावर आता कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. मागील ५ वर्षांतील सरकारच्या चुकांनाही राजीव गांधीच जबाबदार आहेत का?’ असा सवाल काँग्रेसने केला आहे .
काँगेस प्रवक्ता पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या ५ वर्षांतील सरकारच्या गैरकारभारालाही राजीव गांधीच जबाबदार आहेत का? अशी तोफ खेडा यांनी डागली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसने राजीव गांधींच्या नावे निवडणूक लढवावी असे आवाहन केले होते. त्यावर कॉंग्रेसकडून प्रत्यूत्तर देण्यात आले होते .
दरम्यान, देशाला गांधी परिवाराने दोन पंतप्रधान दिले. दोघांचीही हत्या झाली. एवढा मोठा त्याग या परिवाराने करूनही मोदी अशी भाषा वापरतात हे अशोभनीय आहे. पंतप्रधानांनी या पदावर असताना अशा प्रकारची भाषा वापरने हे दुर्दैवी आहे, असेही शरद पवार म्हणाले होते .