मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- राजस्थानच्या भिलवाडा येथे एका हत्येप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताने स्वत: ला मारण्यासाठी सुपारी दिली होती. कुटूंबाला ५० लाखांचा विमा देण्यासाठी मृताने स्वत: ची हत्या केली. बलबीर नावाच्या व्यक्तीचा मृतदेह ७ दिवसांपूर्वी भीलवाड़ा येथील मंगरोपमध्ये सापडला होता. त्याचे हात व पाय विद्युत तारने बांधलेले होते आणि त्याचा गळा दाबण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताने संपूर्ण हत्येचा कट रचला होता. बलवीरने ५० लाख रुपयांचा विमा क्लेम करण्यासाठी स्वत: ला ठार मारण्याचा कट रचला.
यासाठी त्याने २ जणांना ८० हजार रुपयांची सुपारी दिली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, बलवीरने सुनील यादव नावाच्या व्यक्तीला हत्या करण्यासाठी उत्तर प्रदेशवरुन बोलवले होते. सुनील यादवने राजवीरला सोबत घेऊन बलवीरची हत्या केली. राजवीरने यापूर्वी मृत बलवीर बरोबरही काम केले आहे.
या दोघांनी मिळून बलवीरचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी सांगितले की मृतक बलवीरने अनेक लोकांकडून २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याने ही रक्कम लोकांना व्याजावर दिली. त्याला मूळ रक्कम मिळत तर होती पण, व्याज मिळत नव्हते. त्यामुळे तो मागच्या ६ महिन्यापासून वैतागला होता. अडचणीत सापडल्याने त्याने स्वतःला विमा कंपनीकडून ५० लाख रुपयांचा अपघाती विमा मिळविला. त्याच्या बदल्यात त्याने ८ लाख ४३ हजार २०० रुपयांचा प्रीमियमही जमा केला.
त्यानंतर त्याने विमा क्लेम घेण्याच्या उद्देशाने स्वत: ला मारण्याचा कट रचला. घटनेच्या २ दिवस आधी म्हणजेच २ सप्टेंबर रोजी बलवीरने सुनील यादवला स्वत: बरोबर दुचाकीवर घेऊन घटनास्थळ देखील दाखवले. बलवीरची इच्छा होती की त्याच्या मृत्यूनंतर हे पैसे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिले जातील जेणेकरुन कर्जदार कुटुंबाला तंग करू नयेत आणि उर्वरित पैशांसह कुटुंब त्यांचे आयुष्य आरामात घालवू शकेल. बलवीरचे कुटुंबीय सांगत आहेत की, त्या लोकांना हा विमा घेण्याविषयी माहिती नव्हती.