औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – कन्नड विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये मनसेचे आमदार राहिलेल हर्षवर्धन जाधव यांनी राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेत मनसे सोडले होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन २०१४ मध्ये विधानसभा गाठली होती. शिवसेना आमदार असतांना स्वःपक्षातील नेत्यांसोबत खटके उडाल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. आता पुन्हा एकदा हर्षधर्वन जाधव यांनी मनसेचा झेंडा हातात घेण्याची तयारी केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे अशी मागणी होत आहे. मात्र कोणतेही सरकार आले तरी, या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. आता मात्र राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढावा. यासाठी ते नक्कीच पुढे अशी अपेक्षा नुकताच मनसेत प्रवेश केलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची चर्चा महाराष्ट्रात गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. खरंतर जून १९९५ मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या सभेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला. हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला.
पुढे जाधव म्हणाले की, १९९५ ला युतीचं सरकार होते. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे त्यावेळी औरंगाबादचे तर विद्यमान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी नामांतराचा प्रस्ताव मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली. मात्र त्याची आद्यपही अंबलबजावणी झाली नाही. उद्यापासून राज ठाकरे हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर औरंगाबाद येथे येणार आहे. याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करून त्यांना याबाबतची सविस्तर माहिती देईल. अशी माहितीही जाधव यांनी दिली.