बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाची साथ, त्याबद्दल लोकांमध्ये असलेली भीती आणि दीर्घकाळ चाललेली टाळेबंदी तसेच अनेक निर्बंध या कारणांमुळे रिक्षा व्यवसाय मंदावला आहे. कर्जाचे हप्ते, वाढीव वीज बिले, शाळांचे वाढलेले शुल्क यामुळे रिक्षा चालक त्रस्त झाले आहेत. अशा आर्थिक तणावाखाली येरवडा येथील शब्बीर जहांगीर हंनुरे आणि कोंढवा येथील भरत जाधव या रिक्षाचालकांनी आत्महत्या(Aap help) केली.
या आत्महत्यांमुळे रिक्षा चालकांमध्ये अस्वस्थता होती. त्यांना धीर देण्यासाठीआम आदमी रिक्षा चालक संघटना आणि आम आदमी पार्टी त्यांच्या वतीने प्रत्येकी ५ हजार रुपयांचा धनादेश बियामा शब्बीर हंनुरे आणि अश्विनी भरत जाधव यांना सुपूर्द करण्यात आला. या कुटुंबियांच्या मदतीसाठी यापुढेही आम आदमी रिक्षा चालक संघटना उभी राहील, असे संघटनेचे उपाध्यक्ष गणेश ढमाले यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे गणेश वैराट, अशोक (बाबुजी) शिंदे, आसिफ मोमीन, किरण कांबळे, जमील सय्यद, मोईन चौधरी, सरवर शेख तसेच पार्टीचे डॉ. अभिजित मोरे उपस्थित होते.