लखनौ : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रियंका गांधींना सक्रिय राजकारणात उतरवले खरं परंतु कॉंग्रेसचे प्रियांका कार्ड फेल झालेले दिसत दिसले इतकेच नव्हे तर कॉंग्रेसला पारंपरिक मतदारसंघ अमेठीतही जिंकता आले नाही. परंतु अमेठीत खुद्द कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना स्मृती इराणींनी कडवी झुंज दिल्याने ते पराभूत झाले आहेत.
लोकसभेच्या महाराष्ट्रात ४८ जागा आहेत आणि महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली त्यामुळे इथेही त्यांचा जवळपास सुपडासाफ झाला. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपची युती झाली होती. तरी राहुल गांधी आणि सोनिया गांदींच्या मतदारसंघात उमेदवार न देण्याचे मायावतींनी जाहीर केले होते. या खेळीमुळे तरी कॉंग्रेसला फायदा होईल असे म्हटले जात होते परंतु ती आशाही फोल ठरली आहे.
मोदी-शहाच्या जोडीला हरवण्यासाठी कॉंग्रेसने चंग बांधला होता. परंतु पक्षातच ‘प्रियांका गांधी लाव देश बचाओ’ अशा आरोळ्या ठोकण्यात आल्या होत्या. सुरुवातीला पक्षश्रेष्ठींनी ही बाब दुर्लक्ष केली. नंतर ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसने प्रियांका गांधींचा राज्याभिषेक करून महासचिवपदी बसवले. यामुळे तरी काही वेगळा परिणाम होऊन यंदाची लोकसभा निवडणूक जिंकू असे काँग्रेसला वाटले होते परंतु भाजपा सरकारला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही जास्त जागा मिळाल्या.