हैद्राबाद : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपच्या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, ‘ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आला नसून हिंदूंच्या मेंदूत फेरफार करण्यात आला’अशी जोरदार टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.
एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी हैद्राबाद लोकसभा मतदारसंघातन दणदणीत विजय मिळविल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादावर भाजपाचा सामना करु न शकल्याने विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे. विरोधकांना आता नव्याने धोरणं आखण्याची गरज आहे. याशिवाय भाजपाकडे जे निवडणूक तंत्र आहे, त्याने भाजपाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे’.
सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशात निवडणूक आयोगाने स्वायत्त असले पाहिजे. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील मतांची १०० टक्के पडताळणी झाली पाहिजे, असे मला वाटते. मात्र निकाल बघितल्यानंतर मला वाटते कि ईव्हीएममध्ये नव्हे तर हिंदूंच्या मनामध्येच हेराफेरी झाली आहे. अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली.