अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मागासवर्गीय महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चासनळीचे माजी सरपंच कैलास माळी यांची निवड झाली असल्याचे पत्र संघटनेचे कार्याध्यक्ष शरद जावळे यांनी दिले. त्यांच्या निवडीबद्दल कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कैलास माळी म्हणाले, कामगार चळवळीच्या माध्यमातून नागरिकांना सोबत घेऊन आदिवासी व मागासवर्गीय कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहाणार आहे. याप्रसंगी सोमनाथ चांदगुडे, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे, माजी सरपंच संदीप जाधव, राजेंद्र नवले, शरद जावळे, बाळासाहेब ठाकरे, प्रकाश माळी, आण्णा चांदगुडे, आण्णा धेनक, निलेश ब्राम्हणे, संदीप हारणे, संजय माळी, अर्जुन वाघ, बाळू हिंगमिरे, अजय माळी, बापू कासोदे यांच्यासह एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.