नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी डिसेंबरमध्ये भारतातील सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या दरामध्ये वाढ केली होती. ज्यामुळे ग्राहक नाराज असून आता पुन्हा सर्व कंपन्या आपला एक महिन्यांचा प्रीपेड प्लॅन पुन्हा वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या एका महिन्याच्या योजनेत वापरकर्ते पूर्वीपेक्षा ४५ टक्के अधिक पैसे खर्च करत आहेत.
काही दिवसांपूर्वी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने रिलायन्स जिओला ३१ डिसेंबर २०२० पूर्वी किमान किंमत वाढवता येणार नसून रिलायन्स कंपनीने आपला इंटरनेट चार्ज यापूर्वी लागू केला असल्याचे सांगितले होते. तर ३१ डिसेंबर २०२० नंतर किमान किंमत बदलली जाऊ शकतो, असे ट्रायने म्हटले आहे. पण ट्रायने जिओच्या बाजूने निर्णय घेतलेला नाही.
जिओ वगळता भारतातील सर्व टेलिकॉम कंपन्या आर्थिक संकटातून जात असून हे पाहता या कंपन्या आपला एक महिन्यांचा टॅरिफ प्रीपेड प्लॅन लवकरच वाढवू शकतात. कंपन्यांना त्यांच्या योजनांमध्ये वाढ करून त्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे. २८ दिवसांची योजना वापरणार्या लोकांकडे फारच कमी पर्याय आहेत कारण गेल्या महिन्यात २८ दिवसांची योजना १५ टक्क्यांनी वाढली होती. त्यानंतर या योजनांच्या किंमती १४८ रुपयांवर आल्या. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की टेलिकॉम कंपन्यांनी २८ दिवसांच्या योजनेत आपल्या ग्राहकांना अधिक डेटा द्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अहवालानुसार वर्ष 2020 नंतर 28 दिवसांच्या शुल्काच्या योजनांमध्ये 30 टक्के वाढ केली जाऊ शकते. यानंतर, सर्व टेलिकॉम कंपन्यांची डेटा किंमत जिओच्या आगमनापूर्वी जितकी होती तितकीच असेल.