अकोला : बहुजननामा ऑनलाईन – नावापुरती दुष्काळ घोषित करून सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये गांजर देण्याचे काम भाजप – शिवसेना युती सरकार करीत आहे. सोयाबीन कपाशी पिकांना लवकरात लवकर पिकविमा जाहीर करा. तसेंच १२% व्याज पीक विमा रक्कमेवर देण्यात यावे. दुष्काळी निधी देण्यात यावा. याची दखल तात्काळ घ्यावी नाहीतर प्रहार तर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. प्रहार तर्फे आकोट उपविभागीय अधिकाऱ्यांना पिकविम्याबाबत निवेदन देण्यात आले.
२०१८-२०१९ मंजुर पिकविम्या मध्ये सर्व पिकांचा समावेश करण्यात यावा पिकविमा रक्कमे वर १२% व्याज देण्यात यावे तसेच दुष्काळी मदत त्वरित देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आकोट तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यावरसुद्धा कुठलीच शासकीय मदत आता पर्यंत मिळाली नाही. तसेच २०१८-२०१९ मधील पिकांना विमा जाहीर करण्यात आला. तालुक्यामध्ये सोयाबीन व कपाशी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. तसेच शेतकऱ्यांनी बँकांमध्ये मोठया प्रमाणात पीकविमा काढला. परंतु कंपनीचे नुकसान होऊ नये. म्हणून सोयाबीन तसेच कापूस ही पीकं मंजूर पीक विम्यामधून वगळण्यात आली. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सर्व पिकांना विमा मिळणे आवश्यक होते.
परंतु सोयाबीन, कापूस पिकांना विमा न देता विम्याचे पैसे हडप करण्याचा प्रयत्न कंपनी तसेच भाजप शिवसेना युती सरकार करीत आहे. पीक नुकसान झाल्यापासुन २ महिन्याचा आत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक आहे. न केल्यास १२% व्याज लावण्यात येईल असा आदेश या सरकारने काढला होता. त्याचानुसार १२% व्याज पीकविमा रक्कमेवर देण्यात यावे. तसेच दुष्काळ घोषित केल्यावरसुद्धा कुठल्याच प्रकारची मदत शासना तर्फे देण्यात आली नाही.
दुष्काळ घोषित झालेल्या जिल्ह्यामध्ये जनावरांसाठी चारा छावण्या मोठ्या प्रमाणात उघडण्यात आल्या. परंतु प्रशासन तसेच सत्ताधारी यांचा उदासीनतेमुळे अकोला जिल्हामध्ये आवश्यकता असल्यावर सुद्धा चारा छावण्या उघडण्यात आल्या नाहीत. ग्रामीण भागमध्ये पाण्याची भीषण टंचाई असल्यावरसुद्धा कठल्याच उपाय योजना करण्यात आल्या नाही. नावापुरती दुष्काळ घोषित करून सर्वसामान्य जनतेच्या हाता मध्ये गाजर देण्याचे काम भाजप शिवसेना युती सरकार करीत आहे. तरी सोयाबीन कपाशी पिकांना लवकरात लवकर पीक विमा जाहीर करा. तसेंच १२% व्याज पीक विमा रक्कमेवर देण्यात यावे. दुष्काळी निधी देण्यात यावा. याची दखल तात्काळ घ्यावी. नाही तर प्रहार तर्फे उग्र आंदोलन करणयात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हा प्रमुख प्रहार तुषार पुंडकर, उपजिल्हा प्रमुख निखील गावंडे, तालुका कार्याध्यक्ष कुलदीप वसु, तुषार पाचकोर, सागर उकंडे, अविनाश घायसुंदर, विशाल भगत, बंटी पांडे, पवन घरत, अभाजीत खवले, निखील तापडिया, किरण ठाकुर, सुरज बुध, शुभम नारे, अचल बेलसरे, समीर जमादार, गुडू खान, बली भाई, संजय मोळशे, शाम चिकते तसेच बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते.