हैदराबाद : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून अजून काँग्रेस पक्ष सावरला नसून त्यांच्यावर देशभरातून टीकाटिप्पणी होत आहे. यातच एमआयएमचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित खासदार असउद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले कि, काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये जो विजय मिळवला तो मुस्लिमांमुळेच मिळवला कारण त्याठिकाणी जवळपास ४० टक्के मुस्लिम मतदार असल्याचेही ते बोलले. तेलंगणा येथे जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, देशात मुस्लिमांसाठी जागा हवी पण समाजाला कोणाची भीक नको ,स्वातंत्र्यानंतर आमच्या पूर्वजांनी विचार केला असेल की हा नवा भारत आहे. हा देश स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या नेहरू, गांधी, आंबेडकर तसेच इतर कोट्यावधी लोकांचा आहे .मला अजूनही अपेक्षा आहे की, भारतात मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळेल. आम्हाला भीक नको हक्क हवेत असं ओवेसी यांनी म्हंटले आहे.
काँग्रेसला लोकसभेत झालेल्या चुकांचे आत्मपरीक्षण करण्याची इच्छा नाही.तसेच त्यांना कठोर मेहनत घेण्याची गरज आहे. देशभरात भाजपा कुठे हरली असेल तर ती पंजाबमध्ये ज्याठिकाणी शिख आहेत. भाजपाला काँग्रेसने हरवलं नाही तर अनेक प्रादेशिक पक्षांनी हरवले आहे.अशी टीका ओवेसी यांनी काँग्रेसवर केली.
काही दिवसांपूर्वी ओवेसी म्हणाले होते कि, भारतात आह्मी बरोबरीचे हिस्सेदार असून येथे भाड्याने राहत नाही या ठिकाणी बरोबरीचे वाटेकरी म्हणून राहणार आहेत असे ओवेसी म्हणाले होते.
Asaduddin Owaisi, AIMIM: The Congress leader himself lost in Amethi & received victory in Wayanad. Isn't the 40% population of Wayanad Muslim? (09.06.2019) https://t.co/PxQJm7wWbz
— ANI (@ANI) June 9, 2019