नवी दिल्ली : वृत्तसंस्था- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी रशियाच्या व्लादिवोस्तोकमध्ये ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम(EEF)ला संबोधित केलं. यादरम्यान पीएम मोदींनी भारत-रशियाच्या मैत्रीवर भाष्य केलं आणि आपलं धोरण जगासममोर ठेवलं. ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी या कार्यक्रमासाठी मला भारतातील निवडणुकीआधीच निमंत्रण दिले होते. 130 कोटी लोकांनी माझ्यावर भरवसा दाखवला आहे. पुढे मोदी म्हणाले की, “माझे सरकार अॅक्ट ईस्ट मिशनवर काम करत आहे. याअंतर्गत भारत आणि रशियामध्ये जवळपास 50 हून अधिक करार झाले आहेत.
दोन्ही देशाच्या संबंधावर भाष्य
या कर्यक्रमात मोदी म्हणाले की, “मला राष्ट्रपती पुतीन यांच्यामुळे रशियाच्या प्रतिभेला जाणून घेण्यासाठी संधी मिळाली ज्यामुळे मी खूप प्रभावित झालो. भारत आणि पूर्व भागाचे संबंध खूपच जुने आहेत. भारत व्लादिवोस्तोक येथे आपले दूतावास उघडणारा पहिला देश आहे. सोव्हिएत रशियाच्या काळातही भारत-रशिया संबंध मजबूत होते व्लादिवोस्तोक दोन्ही देशांसाठी एक महत्त्वाचं ठिकण बनलं आहे. भारताने येथे एनर्जी सेक्टर आणि इतर रिसोर्सेसमध्ये गुंतवणूक केली आहे.
मोदी म्हणाले की, “रशियाच्या पावलासोबत पाऊल टाकत भारताला चालायचं आहे. आम्ही भारतात सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास सोबत पुढे जात आहोत. 2024 पर्यंत भारताला 5 ट्रिलियन बनवण्यासाठी पुढे जात आहोत.”
FAR EAST मध्ये भारत देणार 1 बिलियन डॉलर
पुढे मोदी म्हणाले की, “भारत आणि रशियाला सोबतीने विकासाचा वेग 1+1= 11 करण्याची संधी आहे. नुकतेच आमच्या देशाचे अनेक नेते येथे आले आणि अनेक विषयांवर चर्चा केली. भारत निसर्गाला वाचवण्यासाठी अनेक पावलं टाकत आहे. पूर्व भागात विकासासाठी भारत 1 बिलियन डॉलरची लाईन ऑफ क्रेडिट देणार आहे. मोदींनी यादरम्यान रशियाच्या पूर्व भागातील सर्व 11 गव्हर्नर्सला भारतात येण्यासाठी आमंत्रण दिले. मोदी म्हणाले की, आज भारत-रशियातील संबंध ऐतिहासिक टप्प्यावर आहेत. भारत आणि रशिया मिळून अंतराळातील अंतर पार करतील आणि समुद्रातील खोलीही मोजतील. लवकरच चेन्नई आणि व्लादिवोस्तोक मध्ये जहाज सुरू होईल.