बहुजननामा ऑनलाईन- पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची माजी पत्नी रेहम खान त्यांच्यावर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही. मिळेलेल्या माहितीनुसार, इमरान खान यांच्या पाकिस्तान सरकारच्या अपयशावर रेहम खान यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. रेहम म्हणाल्या की, इमरान खान या्ंच्यावर कितीही टिका केली तरी ती कमी आहे.
तुम्ही कधी उन्हात उभे राहून कश्मीरचा प्रश्न सोडवू शकत नाही. अशा नाटकांना लोक थकले आहेत. पाकिस्तान सरकार काश्मीरचा मुद्दा योग्यप्रकारे मांडू शकले नाही. म्हणूनच तुमची सरकार पप्पू आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी उमरकोटला जात आहे. मात्र उमरकोटमधील हिंदूंचे सक्तीने धर्मांतरण आणि निर्बंधाबद्दल माझे तोंड उघडण्यास मला भाग पाडू नका.
तसेच, मोदींनी पाकिस्तानच्या नाकाखालून रात्रीतूनच काश्मीर काढून घेतला आणि तुम्हाला कळूही दिले नाही. मोदींना दुषणे देऊन तुम्ही काश्मीर परत मिळवू शकत नाही. लोकांना फसवणे थांबवा. प्रथमतः तर मी युद्धाच्या विरोधात आहे. तर पाकिस्तानी तरुणांनी शाळा-महाविद्यालय सोडून रस्त्यावर किंवा सीमेवर उभे राहून घोषणाबाजी करुन भारतीयांची गोळी खाण्याच्या मी सक्त विरोधात असल्याचेही रेहम यांनी सांगितले.