तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था – केरळात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे. राज्यात मंगळवारी 67 नव्या केस समोर आल्या. राज्यात एक लाखपेक्षा जास्त लोक देखरेखीखाली आहेत. येथील एकुण रूग्णांची संख्या 963 आहे, ज्यापैकी 415 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सरकारने निर्णय घेतला आहे की, जे लोक परदेशातून परतले आहेत, त्यांच्याकडून क्वारंटाईनचे पैसे वसूल करण्यात येतील. याशिवाय, देशाच्या विविध भागातून परतलेल्या लोकांना संस्थागत क्वारंटाईन केले जाईल, त्यांना सुद्धा पैसे भरावे लागतील.
केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी मंगळवारी ही माहिती देताना म्हटले की, लाखोंच्या संख्येने लोक राज्यात येत आहेत. जे लोक संस्थागत क्वारंटाईन आहेत त्यांना पैसे भरावे लागतील. सरकार एकटे या लोकांचा खर्च उचलू शकत नाही. मात्र, हा नियम सर्वांना लागू नाही. परंतु, परदेशातून आलेल्या सर्व लोकांना लागू आहे.
विजयन म्हणाले, राज्य सरकार विविध प्रकारच्या भरणा श्रेणी तयार करेल आणि कमीतकमी पैसे घेईल. सरकार क्वारंटाईनचे जे पैसे घेईल ते खुप कमी असतील.
ते म्हणाले, देशाच्या अनेक राज्यातून आणि परदेशातून मोठ्या संख्येने राज्यात परत येण्यासाठी रजिस्ट्रेशन केले गेले आहे. आम्ही परत येणार्या लोकांचे स्वागत करत आहोत. एकदा हे लोक येथे आले तर त्यांना क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागेल.
मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत एक लाखपेक्षा जास्त लोक विविध राज्यातून केरळात आले आहेत. याशिवाय, परदेशातून 1.35 लाखपैकी 11,189 लोक परत आले आहेत.