नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील झालेल्या वादामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलच तापलं आहे. अमित शहा यांनी त्यांच्या रोड शोसाठी कोलकात्यात बाहेरून लोक आणले होते. ते लोकच हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने केला. बंगालबाहेरील भाजपच्या गुंडांनी महाविद्यालयातील दिग्गज तत्वज्ञ ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली आहे.
भाजपाला बंगालचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती यांची माहिती आहे का? बंगाल त्यांना कधीच माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया तृणमूलचे प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी दिली. तर भाजपने विद्यासागर यांना वाहिलेली हीच आदरांजली आहे का, असा सवाल तृणमूलच्या आणखी एका नेत्याने केला.
त्यामुळे, काल झालेल्या रोड शोमधील राड्यावरून भाजप आणि तृणमूलमध्ये चांगलेच वातावरण तापले असून देशभरातून यांवर प्रतिक्रिया येत आहेत.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील झालेल्या वादामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलच तापलं आहे. अमित शहा यांनी त्यांच्या रोड शोसाठी कोलकात्यात बाहेरून लोक आणले होते. ते लोकच हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने केला. बंगालबाहेरील भाजपच्या गुंडांनी महाविद्यालयातील दिग्गज तत्वज्ञ ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली आहे.
भाजपाला बंगालचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती यांची माहिती आहे का? बंगाल त्यांना कधीच माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया तृणमूलचे प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी दिली. तर भाजपने विद्यासागर यांना वाहिलेली हीच आदरांजली आहे का, असा सवाल तृणमूलच्या आणखी एका नेत्याने केला.
त्यामुळे, काल झालेल्या रोड शोमधील राड्यावरून भाजप आणि तृणमूलमध्ये चांगलेच वातावरण तापले असून देशभरातून यांवर प्रतिक्रिया येत आहेत.