मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील झालेल्या वादामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलच तापलं आहे. ममता बॅनर्जी पराजयाच्या भीतीनं लोकशाही पायदळी तुडवत असून तेथील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असल्याची जोरदार टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने तेथील निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावे, तसेच यावर निवडणूक आयोगाकडून कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाकडे केली आहे.
भाजप नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी मनाई करण्यात येत आहे.नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारली जात आहे. राज्य म्हणजे मालकी असे समजून राज्य कारभार केला जात आहे, असा घणाघात त्यांनी केला. यंदाच्या निवडणुकीत ममतांना जनता नमविल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, काल पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान मोठा हिंसाचार झाला. अमित शहा उभे असलेल्या ट्रकवर काठ्या फेकण्यात आल्या. ताफ्यावर दगडफेकही झाली. त्यानंतर जाळपोळीचे प्रकारही घडले. अमित शहा यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.