अकोला : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रात व राज्यात भारतीय राज्यघटना बदलण्याचे प्रयत्न काही लोक करीत आहेत, ते हाणून पाडायचे असल्यामुळे प्रत्येकाने जागरुक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा. अंजली आंबेडकर यांनी केले. व्याळा सर्कलमधील विविध शाखा उद्घाटनप्रसंगी प्रा. अंजली आंबेडकर उपस्थित होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, भारतीय राज्यघटनेमध्ये सामान्य, कष्टकऱ्यांचे हित जोपासले आहे. ही राज्यघटना काही लोक बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आपण सर्वांनी हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे.
याप्रसंगी भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पुष्पा इंगळे, राजेंद्र्र पातोडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. रहेमान खान, तालुका अध्यक्ष गजानन लांडे, फजसुर रहेमान, नीरंजन शिरसाट, प्रा. समाधान सावदेकर, सूरज सोनवणे, मंगेश गवई, अविनाश खंडारे, धर्मेंद्र दंदी, विष्णू जठाळ, अर्चना थोरात आदींची उपस्थिती होती.
संचालन उपसरपंच विश्वास खाडे, तर पाहुण्यांचे स्वागत प्रमोद वानखडे, कैलाश इंगळे, संतोष कात्रे, अरुण कात्रे, सीमा दामोदर, संदीप दामोदर, संघपाल वानखडे, अविनाश पवार, रत्नाबाई वानखडे, वेणू दामोदर यांनी केले. यावेळी नीलेश म्हैसने, ज्ञानेश्वर गिऱ्हे, नंदू बोचरे, ईश्वर राऊत, मोहन गिरे, गणेश बोचरे, अनिल बोचरे, विजय बोचरे, विठ्ठल म्हैसने, विष्णू म्हैसने, तुकाराम सोळंके प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समस्त कार्यकर्ते व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.