बहुजननामा ऑनलाइन टीम – पालघर(Palghar) जमाव हत्या प्रकरणामध्ये तेथील विशेष कोर्टाने मंगळवारी चार आरोपींचा जामीन मंजूर केला. ज्यामध्ये वडील आणि त्यांचे दोन मुले सामिल आहे. जिल्हा न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी या चारही आरोपींना 15,000-15,000 रुपयांच्या जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.
या प्रकरणामध्ये सुमारे 200 लोकांना अटक करण्यात आले होते; परंतु केवळ लक्ष्मण रामजी जाधव (वय 58), नितीन लक्ष्मण जाधव (वय26), मनोज लक्ष्मण जाधव (वय 25) आणि तुकाराम रूपजी सेठ (वय 40) यांना जामीन मंजूर झाला. हे सर्व जण गडचिंचले गावच्या हेडपाडा येथील रहिवासी आहेत.
यावर्षी एप्रिलमध्ये कारमध्ये गुजरातला जाणारे दोन साधू आणि त्यांच्या चालकांचा पालघर जिल्ह्यात जमावाने मारहाण करून त्यांची हत्या केली होती.