नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणात वाढ झाली असून ती आता ३०४ वर पोचली आहे. तथापि इम्रान सरकारने इराणच्या सीमेवर कोरोना पीडित व्यक्तींच्या उपचारासाठी तयार केलेले संगोपन शिबिर बनवले असून ते आता प्रश्नांच्या जाळ्यात अडकले आहे.
एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार या क्वारंटाइन कॅम्पची केवळ गुणवत्ताच खराब नाही तर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ बनवले गेले आहेत. बर्याच लोकांनी या शिबिराची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत इम्रान सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाकच्या सिंध प्रांतात सर्वाधिक कोरोना संक्रमणाची प्रकरणे नोंदली गेले आहेत. सिंधच्या आरोग्य मंत्र्यांच्या प्रवक्त्या मरीन युसुफच्या यांच्या मते, पाकिस्तानमध्ये कोरोनाची प्रकरणे खराब व्यवस्थेमुळे नव्हे तर लोकांना लोकांना या आजाराबद्दल कमी माहिती असल्याने वाढत आहेत.
PM Imran Khan praises Balochistan govt for making excellent #Quarantine arrangements at #Taftaan border for Pakistanis returning from Iran. The reality is explained in this video & it’s chilling …#QuarantineLife #COVID2019 #CoronaVirusPakistan pic.twitter.com/pKgiZQT3ds
— Murtaza Ali Shah (@MurtazaViews) March 17, 2020
प्रश्नांच्या जाळ्यात इम्रान सरकार
इराण सीमेवर असलेल्या ताफ्तान शिबिराच्या लोकांनी सांगितले की येथे राहायची स्थिती खूपच वाईट आहे आणि खाण्या-पिण्याच्याही अनके अडचणींचाही आहेत. पाकिस्तानने कोरोनासाठी प्रोसिजर तयार केली असून जर एखाद्या पॉजिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात येणारी व्यक्ती चाचणीत निगेटिव्ह आढळला तर त्याला १४ दिवस क्वारंटाइन कॅम्पमध्येच राहावे लागेल.
तथापि क्वारंटाइन कॅम्प चालवणार्या प्राधिकरणाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. बलूचिस्तान सरकारचे प्रवक्ते लियाकत शहवानी यांनी स्पष्टीकरण दिले की, सर्व काम WHO ने सुचविलेल्या नियमांनुसार केले जात आहे. पण छावणीत राहणारे आमिर अली यांनी अशी अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली असून ही चित्रे तिथली परिस्थिती खराब असल्याचे दर्शवत आहेत. आमिरच्या म्हणण्यानुसार या कॅम्पमध्ये राहण्यासाठी आता जागा नाही. याशिवाय लोकांना अन्न व औषधांचा तुटवडादेखील सहन करावा लागत आहे.