नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भारताकडून जे पाऊल उचचले गेले आहे त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. एका पाकिस्तानी वृतपत्राने दावा केला आहे की, पहिल्यांदा 10 हजार सैनिक पाठवल्यानंतर भारताने आता 28 हजार अतिरीक्त सेन्य काश्मीरमध्ये पाठवलं आहे. एका उर्दू वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे.
या वृत्तपत्राने शुक्रवारी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने काश्मीरमध्ये 10 हजार सैन्य पाठवल्यानंतर काही दिवसांतच 28 हजार अतिरीक्त सैन्य काश्मीरमध्ये तैनात केले आहेत. या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, पाकिस्तानातील सैन्यही पूर्णपणे सतर्क आहे. यावर पूर्णपणे नजर ठेवून आहे.
सदर रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “भारतीय सुरक्षा दलातील 28 हजार सैन्य व्हॅलीमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. यात अधिकाधिक संख्या सेंट्रल आर्म्ड पॅरा मिलिट्री फोर्सच्या अधिकाऱ्यांचा आणि जवानांचा समावेश आहे. या व्हॅलीमधील ग्रामीण आणि शहरी भागात हे जवान पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही की, 28 हजार अतिरीक्त सैन्य तैनात करण्याचे काय कारण आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.