अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी जे लोक आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपला पक्ष सोडून भाजप-शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांवर आमदार बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना जोड्याने मारलं पाहिजे. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
१०-१० वर्षे आमदार होऊनही ज्यांना वाटतं की आता पुन्हा सत्ता हवी आहे. त्यासाठी ते पक्ष बदलत आहे. सध्या मैदानात एकच पहिलवान आहे. कुस्ती होईल की नाही माहित नाही. कारण सत्तेचे लालची लोक पुन्हा आमदार होण्यासाठी पक्षांततर करत आहेत. जर पुन्हा आमदार होण्यासाठी हे लोक पक्षांतर करत आहेत. त्यांना मतदारांनी जोड्याने मारले पाहिजे. असे ते म्हणाले.
सत्तेच्या मागे पळणारे लोकप्रतिनिधी निवडून यायला नाही पाहिजे. नैतिकता, विचारधारा असायला हवी. आम्ही पंधरा वर्षे एकाच ठिकाणी स्वत: ला विचारधारेच्या खांबाला बांधून ठेवले आहे. पण सत्तेसाठी पक्षांतर करणारे नालायक लोक या देशात असतील ते हिजड्याची औलाद असतील. मतदारांनी मतदानातून अशा नेत्यांना जनतेने रस्त्यावर आणले पाहिजे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही फक्त जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. सत्तेचा वापर हा पक्ष बांधणीसाठी होत असेल तर ते चुकीचे आहे. या जनादेश यात्रेत जनता कुठेच नाही. फक्त आदेश दिसून येत आहे.जनतेच्या प्रश्नांवर काहीच बोलले जात नाही. अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.