मुंबई बहुजननामा : ईव्हीएम मशीन मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मतदान हे मतपत्रीकेद्वारेच घेण्यात यावं अन्यथा देशातील लोकशाही धोक्यात येईल. त्यामुळे ईव्हीएम मशीन गेली , तर भाजप देखील जाईल. असा हल्लाबोल राज यांनी केला. देशभरातील सगळे नेते ईव्हीएम मशीन विरोधात एकत्र आले आहेत. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संगठनेचे राजू शेट्टी, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार आणि अनेक विरोधी पक्ष देखील आघाडीवर आहेत. शुक्रवारी या सर्वानी एकत्र पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मशीन मुद्द्यावर विरोध दर्शविला. त्यामुळे आगामी विधासभा निवडणूक हि मतपत्रिकेद्व्यारे घेण्यात यावी अशी इच्छा सर्वानी व्यक्त केली.
ईव्हीएम मशीन विरोधात जनजागृती रॅलीला २१ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. तसेच मनसे कार्यकर्ते घरोघरी जाऊन त्या स्वाक्षरी मोहीम राबवणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलकात्याला जाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ईव्हीएम मशीन मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा झाली. ईव्हीएम गेले तर भाजप देखील जाईल , असा विश्वास त्यांनी दर्शविला आहे. ममता यांच्या भेटीबद्दल राज म्हणाले, “ईव्हीएम मशीन मुद्द्यावरील माझी भेट यशस्वी झाली. ममता दीदींनी मला पाठिंबा दर्शविला आहे. त्याचप्रमाणे सोनिया गांधी यांनी देखील पाठिंबा दिला हे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत ईव्हीएम मुद्द्यावर विरोध दर्शविला.”
सर्वोच्च न्यायालय , निवडवणूक आयोग हे दबावाखाली आहेत. भाजप ३०० जागा जिंकू असा नेमका कसा सांगू शकतात. जर त्यांना त्यांच्या विजयाचा इतका विश्वास आहे तर ते मतपत्रिकेंद्व्यारे निवडणूक घेण्यास का घाबरतात ? मतपत्रिकेद्वारे निवडणूका झाल्या तर भाजपला आत्मचिंतनाची गरज आहे, असा घणाघात राज यांनी केला. तसेच मनसे निवडणूक लढवेल कि नाही ह्यापेक्षा ईव्हीएम चा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. जर मतपत्रिकेंद्व्यारे निवडणूक होऊन भाजप विजयी झाले तर मी स्वतः त्यांचे अभिनंदन करील.