पुणे : बहुजननामा ऑनलाईन : भाजपने २०१४ च्या बिहार निवडणूकीत संविधान समिक्षेची घोषणा केल्यानंतर पराभव झाला. पराभव होऊनही संघवाले आणि भाजप वाले सुधारले नाहीत. २०१९ व २०२४ मध्ये आमचे सरकार येणार आहे. २०२४ ला आम्ही घटना बदलू असे सांगत आहेत. घटना बदलू पाहणाऱ्या भाजपला गाडून टाकण्याची गाठ सर्वांनीच बांधली पाहिजे. वंचित उठाव करेल याला संघर्षाचं वळण दिले जात आहे. सत्तर वर्षे सत्ता, अधिकार, विकासापासून वंचित राहिलो. आता आमची मान आमच्याच खांद्यावर ठेवणार आहोत. कारण सत्तर वर्षे या मानेवर सुरीच चालली. त्यामुळे आता आम्ही आमचा विकास करणार आहोत. असे एड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. पिंपरीतील एच. ए. मैदानात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात ते सोमवारी बोलत होते.
यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, पद्मश्री आमदार लक्ष्मण माने, अशोक सरोदे, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या देशात दोन सरकार चालत आहेत. एक संविधानानुसार राष्ट्रपती चालवत आहेत. तर दुसरे आरएसएस समांतर सरकार चालवित आहे. पुण्यातील एल्गार परिषदेत सहभागी झालेल्यांना नक्षलवादी ठरवून गुन्हे दाखल केले. पण भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या कुलकर्णीच्या घरात हत्यारे सापडली. त्याने ती का साठवली. मुस्लिमाकडे हत्यारे सापडली असती तर त्याला टेररिस्ट, दलिताच्या सापडली तर नक्षलवादी, आदीवासीकडे सापडली तर नक्षलवादी आणि ओबीसीकडे सापडली तर तो वेडा झाला असे म्हणून त्यांना त्रास दिला जातो. असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बिल्डरांची पार्टी आहे. शहरात ८० झोपडपट्ट्या आहेत. एसआरएच्या नावाखाली खुराडे बांधली आहेत. एका कुटुंबाला सन्मानाने राहण्यासाठी किती जागा लागते. परंतु झोपडपट्या उठवून सरकारने जमीनी बिल्डरांच्या घशात घातल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये असलेली एच. ए. कंपनी आजही तिचे पेनिसिलीन औषख भारतभर वापरले जाते, ही कंपनी बंद पाडून जमीन लाटण्याचा डाव कोणाचा होता. ही जमीन कोणाला हवी होती हे सर्वांना माहित आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही सत्तेत आलो तर पिंपरी चिंचवडमधील कामगारांना पहिल्यांदा परमनन्ट करू. असेही त्यांनी सांगितले.