नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक काही दिवसरवरच येऊन ठेपल्या असताना. भाजपचे एनडीएमधील मित्र पक्ष एक एक करून भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. उत्तर प्रदेशात भाजपासोबत आघाडी असलेल्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी एनडीए सोडण्याचा इशारा दिला आहे.
अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, भाजपला आपल्या मित्रपक्षांना सांभाळून घेता येत नाही. अपना दलने भाजपला २० फेब्रुवारीपर्यंत आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यास सांगितले होते. मात्र भाजपाने आमच्या तक्रारींचे निवारण केलेले नाही. त्यामुळे आता अपना दल आपला निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे. २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ असे त्या म्हणाल्या. काही दिवसापूर्वी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पार्टीने एनडीएमधून माघार घेतली आहे. लोकजनशक्ती पार्टीच्या जागावाटपारून मतभेद पाहायला मिळत होते. पण सरकार त्यांची समजुत काढण्यात यशश्वी झाले का ? येणारा काळ सांगेल.
अनुप्रिया पटेल यांनी भाजपने दिलेली आश्वासने, तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला. लोकसभा निवडणुकीत राम मंदिर हा मुद्दा बनेल का असे विचारले असता अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, मला वाटत नाही की राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा बनेल, तसेच आगामी निवडणुकीत कुणाचे तिकीट कापायचे आणि कुणाला उमेदवारी द्यायची हा पूर्णपणे भाजपचा अंतर्गत निर्णय असेल, पण भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षासोबत मित्रत्वं टिकवेल का येणारी वेळ सांगेल.