औरंगाबाद बहुजननामा : आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ काम करणारा कार्यकर्ता घडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली आहे. राज्यातील प्रत्येक ठिकाणी जाऊन वंचित बहुजन आघाडी आता प्रशिक्षणं घेणार आहे. यासाठी पक्ष आता जातसमुदायास केंद्रबिंदू बनवणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तपत्रास दिलेल्या माहितीनुसार धनगर आणि भटके विमुक्त या समूहाची प्रशिक्षणे पूर्ण झाली असून , मुस्लिम मौलींशी देखील या या संदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणाच्या माध्यमांतून भविष्यात कोणकोणत्या घटकांवर काम करता येईल, त्याची उभारणी कश्या पद्धतीने करता येईल, त्या संबंधीचा संपूर्ण आराखडा मांडला जाणार आहे. जळगावचे सोने आणि औरंगाबाद मधील अजिंठा लेणी या दोन घटकांना पूढे नेणार आहोत, ज्यांचा कधीच विचार केला गेला नाही. त्यामुळे नवीन घटकांचा विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची साखळी वंचित बहुजन आघाडी तयार करणार आहे.
वंचित आघाडीतील जनसामांन्याचे प्रश्न हे अगदी वेगळे असतात. भटक्या विमुक्त लोकांना राहण्यासाठी जागा , धनगर समाजास शेळ्या मेंढ्याना चरण्यासाठी जागा हवी असते. त्यामुळे जातसमुदायाला केंद्रस्थानी ठेऊनच प्रशिक्षण दिले जाणार आहे. पक्षाला आतापर्यंत जोडलेल्या माणसांनादेखील हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. तसेच काँग्रेस पक्षाशी आघाडी संदर्भात कश्या प्रकारे चर्चा सुरु आहे, असा प्रश्न विचारल्यास , काँग्रेस पक्षाची भाषा हि कंबरेखालची असते. यासाठी काँग्रेस ने माफी मागणे गरजेचे आहे. त्याचे राजकारण रेडलाईट एरियातले असावे अशी भाषा आहे. आमचे आघाडीसंर्भात अजूनही काही बोलणे नाही. फोनवरही त्यांच्या काही बोलणे नाही. असे आंबेडकर यांनी सांगितले.