मुंबई : वृत्तसंस्था – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जय्यत तयारी सुरु केली असून खुद्द मुख्यमंत्री राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात ‘फिर एक बार शिवशाही सरकार ‘आणि ‘अब कि बार २२० पार’ या आशयाची घोषवाक्ये घेऊन ऑगष्ट महिन्यात रथ यात्रा काढणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक शनिवारी मुंबईत घेण्यात आली. यावेळी पुढचा मुख्यमंत्रीही भाजपचाच असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. शिवसेनेकडून संघटना बांधणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. संघटनेत १ लाख नव्या शाखाप्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य यांनी दौऱ्यांना सुरुवात केली आहे. शिवसेनेचे काही नेते आणि युवासेना आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून ‘प्रमोट ‘करीत आहेत.
यापार्श्वभूमीवर युतीत मुख्यमंत्री पदावरून ‘मिठाचा खडा’ पडणार हे निश्चित आहे. त्यामुळे कालपरवापर्यंत राज्यात कमी ताकद असलेला भाजप आतमितीस प्रबळ बनला आहे. त्यामुळे आगामी सत्तासमीकरणांसाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ खुद्द मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे पिंजून काढणार आहेत. त्यासाठी रथयात्रा काढून राज्यातील मतदारांशी संपर्क साधला जाणार आहे. त्यासाठी ‘फिर एक बार शिवशाही सरकार ‘आणि ‘अब कि बार २२० पार’ या आशयाची घोषवाक्येही तयार करण्यात आली आहेत .
आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी
एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव