मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्या बँका नवनवीन बदल करत आहे. बँका सुरक्षेच्या कारणास्तव हे बदल करत आहेत. ग्राहकांना हॅकर्सपासून वाचवण्यासाठी आणि खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँका नवनवीन गोष्टींचा वापर करत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशांनंतर आता एटीएमचे फ्रॉड थांबवण्यासाठी बँकांनी विविध पावले उचलायला सुरुवात केली आहे.
कॅनरा बँकेने एटीएममधून कार्डद्वारे १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढताना ग्राहकांना ओटीपी बंधनकारक केला आहे. म्हणजेच जर तुम्हाला १० हजार पेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर पिनसोबत तुम्हाला ओटीपीही द्यावा लागेल.अन्य बँकादेखील कॅनरा बँकेप्रमाणेच हा ओटीपीचा नियम सुरु करू शकतात.
आरबीआयने सांगितले आहे की, एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखायला हवी. एटीएम फसवणुकीचे प्रकार रात्री ११ पासून सकाळी ६ वाजेपर्यंत सर्वाधिक होतात. अलीकडेच एटीएम कार्डच्या क्लोनिंगचे प्रकारही समोर आले होते. महाराष्ट्रात या दरम्यान २३३ गुन्हे दाखल झाले. २०१८-१९ मध्ये दिल्लीत १७९ एटीएम फसवणुकीचे गुन्ही दाखल झाले.