नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयने फासावर लटकवू नये म्हणून एक नवीन युक्ती केली असून त्याच्या वकिलांनुसार अक्षयने १ फेब्रुवारीला राष्ट्रपतींना पात्र लिहिले होते. अक्षयने स्वाक्षरी न करता राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. म्हणून तिची दाखल घेतली जाऊ नये.
तर अक्षयचे वकील ए. पी. सिंह यांच्या मते राष्ट्रपती भवनात मान्यता असलेल्या शिक्क्यांशी संलग्न पत्रात १ जानेवारी रोजी दाखल केलेल्या दया याचिकेवर अक्षय यांची सही आणि अंगठ्याचे प्रिंट नसून तिहार जेल प्रशासनाने याचिका प्रमाणित केलेली नाही, असे म्हटले आहे. तसेच आरोपीची आर्थिक परिस्थिती व त्या प्रकरणाची पूर्ण माहिती न घेता घाईत याचिका दाखल केली आहे.
तसेच या प्रकरणात दिल्ली सरकारने पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली असून डेथ वॉरन्टची मागणी केली आहे. तिहार जेल प्रशासनाने पटियाला हाऊस कोर्टात अर्ज दाखल करत चार दोषींवर नव्याने मृत्यूदंडाची मागणी केली आहे. अक्षय, मुकेश आणि विनय यांची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली असल्याचे तिहार जेल प्रशासनाने आपल्या अर्जात म्हटले आहे. पण तिहार जेल प्रशासनाने कोणत्याही फोरममध्ये दोषीची कोणतीही याचिका प्रलंबित नाही, त्यामुळे नवीन मृत्यूदंड वॉरंट देण्यात यावा, असा युक्तिवाद केला आहे.